Vihir Anundan Yojana : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे.
विहीर खोदण्यासाठी सरकारकडून मिळणार 5 लाख रुपये
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) आता विहीर खोदण्याच्या अनुदानात वाढ करण्यात आली असून, एकूण अनुदानाची मर्यादा आता 5 लाख रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी हे अनुदान केवळ 4 लाख रुपयांपर्यंत मर्यादित होते.
विहीर खोदण्यासाठी सरकारकडून मिळणार 5 लाख रुपये
शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता वाढवण्याच्या हेतूने मनरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले जाते. नव्याने वाढवलेल्या अनुदानामुळे कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना शेती सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे. ही योजना केवळ त्या गावांमध्ये लागू आहे जिथे मनरेगाचे काम सुरू आहे.