Satbara Nondi : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधी कामकाज अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता विहीर, बोअरवेल आणि झाडांची नोंदणी केवळ एका स्मार्टफोनच्या सहाय्याने करता येणार आहे.
सातबाऱ्यावर विहीर, बोअरवेलची घरबसल्या 5 मिनिटांत करा नोंद
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधी कामकाज अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने काही दिवसांपूर्वी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता विहीर, बोअरवेल आणि झाडांची नोंदणी केवळ एका स्मार्टफोनच्या सहाय्याने करता येणार आहे. ही सेवा पूर्णपणे ऑनलाईन असून, पारंपरिक कागदपत्रांची झंझट, तलाठ्यांच्या फेऱ्या आणि दलालांच्या अवलंबतेपासून शेतकऱ्यांची मुक्तता होणार आहे.
सातबाऱ्यावर विहीर, बोअरवेलची घरबसल्या 5 मिनिटांत करा नोंद
आता वेळ आणि श्रमांची बचत :-
पूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील विहीर किंवा बोअरवेल सातबारा उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तलाठी कार्यालयात वारंवार जावे लागे. नोंदणीसाठी विविध पुरावे, फॉर्म आणि वेळखाऊ प्रक्रियांचा सामना करावा लागत असे. मात्र, शासनाने आता ही सर्व प्रक्रिया डिजिटल केली असून, “ई-पीक पाहणी DCS 2.0” प्रणालीद्वारे नोंदणी सुलभ झाली आहे.
सातबाऱ्यावर विहीर, बोअरवेलची घरबसल्या 5 मिनिटांत करा नोंद
शेतकऱ्यांना होणारे फायदे काय?
1) घरबसल्या नोंदणी केल्याने तलाठ्यांच्या फेऱ्या टाळता येतात. नोंदणीकृत विहिरीमुळे शासनाच्या जलसिंचन योजनांचा लाभ घेता येतो.
2) पाणीपुरवठा किंवा सिंचन योजनेंतर्गत अनुदान मिळवणे शक्य होते.
3) सातबाऱ्यावर थेट नोंद झाल्याने, कर्ज घेणे किंवा सरकारी मदत मिळवणे अधिक सोपे होते.
दरम्यान, सातबाऱ्यावर थेट डिजिटल नोंद झाल्याने या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांच्या नावावर खात्रीशीरपणे राहतो. भविष्यात शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी ही नोंद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.