नोंदणी कायद्यातील महत्त्वपूर्ण बदल काय आहेत?

राज्य सरकारने नोंदणी कायद्यात 18 अ आणि 18 ब अशी दोन उपपरिशिष्टे नव्याने समाविष्ट केली आहेत. याअंतर्गत, खरेदी-विक्री दस्त सादर करताना जर जमिनीवर कायद्याने बंदी असेल आणि सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतलेली नसेल, तर दुय्यम निबंधक त्या दस्तांची नोंदणी नाकारू शकतो.

कोणत्या प्रकारच्या जमिनींवर बंधने लागू होतील?

केंद्र व राज्य शासनाच्या मालकीच्या जमिनी वर्ग २ जमिनी जसे की,देवस्थान इमानी जमीन, वतन जमीन,वन जमीन,गायरान वस्ती,पुनर्वसनासाठी दिलेली जमीन

पूर्वी काय होतं? आता काय होईल?

पूर्वी अशा जमिनींच्या खरेदी-विक्रीसाठी खरेदीपत्र तयार करून, नंतर सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेतली जात असे. या प्रक्रियेत अनेकदा बनावट परवानग्या तयार करून बेकायदेशीर व्यवहार केले जात होते. परिणामी सरकारचा महसूल बुडत असे आणि सामान्य नागरिकांची फसवणूक होत होती. नवीन कायद्यानुसार,जर जमिनीवर बंदी असेल किंवा 7/12 उताऱ्यावर अशा नोंदी असतील, तर दुय्यम निबंधक अशा दस्तांची नोंदणी थेट नाकारू शकतो? त्यासाठी कोणत्याही वरच्या अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता उरणार नाही.